Sunday, August 8, 2010

Quotes from Book "Vyakti Aani Valli"



१. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांचे 'भय्या' आणि 'मद्राशी' असे दोन स्थल विभाग मी करू शकतो. विभाग जरा स्थूल वाटला तर 'वानियाभय' असेल असा अंदाज. ह्या वानियाभायामध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. 'शीख' ओळखता येतो; पण कालचा शीख आज ओळखता येत नाही."

२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?

 

Author : – Pu. La. Deshpande
Book : - Vyakti Aani Valli

















No comments:

Video